Dombivli : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त डोंबिवलीतील सावरकर उद्यानात कार्यक्रम

माय मराठी
2 Min Read

डोंबिवली  (Dombivli) (शंकर जाधव)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त डोंबिवलीतील (Dombivli) सावरकर उद्यानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सावरकर अभ्यासक आणि लेखक अक्षय जोग यांनी “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अपरिचित पैलू आणि आजचा भारत” या विषयावर सखोल विचार मांडले. त्यांच्या भाषणाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अक्षय जोग यांनी सावरकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडताना सांगितले की, “सावरकर हे केवळ लेखक, कवी, नाटककार किंवा तत्त्वज्ञ नव्हते, तर ते हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असूनही एक दूरदृष्टी असलेले पुरोगामी नेते होते.” त्यांनी शतकापूर्वी मांडलेली जातपात विरहित हिंदू संघटनेची कल्पना आजच्या सामाजिक वास्तवात अधोरेखित होत आहे, असे त्यांनी नमूद केले.

सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगताना जोग यांनी मार्सेलसच्या समुद्रातील उडी आणि त्यानंतर फ्रेंच सरकारच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. “सावरकरांना इंग्रजांना परत दिल्यामुळे फ्रान्समध्ये मोठा संताप उसळला होता आणि त्यातूनच सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला,” असा इतिहास त्यांनी रसाळ भाषेत उलगडला. या क्षणी उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

कार्यक्रमास भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश महामंत्री शशीकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष नंदू परब, ग्रामीण मंडल अध्यक्ष मनीषाताई राणे, पश्चिम मंडल अध्यक्ष प्रिया जोशी, पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, तसेच नगरसेवक राहुल दामले, पप्पू म्हात्रे, निलेश म्हात्रे, विनोद काळण, माजी नगरसेविका खुशबू चौधरी, रेखा चौधरी यांच्यासह अनेक सावरकरप्रेमी नागरिक उपस्थित होते.

हा कार्यक्रम केवळ सावरकरांच्या कार्याची आठवण नव्हे, तर त्यांच्या विचारांना नव्याने समजून घेण्याची एक प्रेरक संधी ठरली.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more