राज्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर काही दिवस मुसळधार पाऊस पडला. (Rain Update) त्यानंतर ३० मे पासून पावसाचा जोर कमी झाला. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत. मात्र अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह वादळाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, १ ते ३१ मे पर्यंत सिंधुदुर्गमध्ये ५६४.७ मिमी पावसाची नोंद झाली. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार, मे महिन्याच्या सुरुवातीपासून मान्सून सुरू होईपर्यंत अनेक भागात अधूनमधून पाऊस पडत होता. सिंधुदुर्गसह रत्नागिरीमध्ये ५५७.६ मिमी पावसाची नोंद झाली. बुलढाणा येथे १८७.४ मिमी, तर रायगड येथे ४५९.४ मिमी पावसाची नोंद झाली.
KDMC Crime : ठाकुर्लीच्या ९० फुटी रस्त्यांवर चोरीचे वाढते प्रमाण
गेल्या पाच दिवसांपासून मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मंदावल्याने राज्यात पावसाची तीव्रता कमी झाली आहे. पावसाची तीव्रता आता कमी झाली असली तरी, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जूनमध्ये राज्यातील अनेक भागात एकूण पाऊस सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार, पुढील आठवड्यात पुन्हा मान्सूनचा पाऊस तीव्र होण्याची शक्यता आहे. यावेळी, अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, मराठवाड्यातील जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.