Amit thackrey: युती माध्यमांसमोर किंवा वर्तमानपत्रात बोलून होत नाही असं अमित ठाकरे का म्हणाले ?

माय मराठी
2 Min Read

पर्यावरण दिनानिमित्त दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेने खिळेमुक्त वृक्ष मोहीम सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit thackrey)  यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. माध्यम प्रतिनिधींना उत्तर देताना अमित ठाकरे (Amit thackrey) यांनी मनसे आणि शिवसेना युतीवरही भाष्य केले. “दोन्ही भावांनी बोलले पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात.”

“माझी भूमिका अशी आहे की दोन्ही भावांनी बोलले पाहिजे. आपण बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र येण्याने मला काही हरकत नाही. मी २०१४, २०१७ मध्ये पाहिले आहे, कोरोना काळातही पाहिले आहे, कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज साहेबांनी पहिल्यांदा उद्धवजींना फोन केला होता. त्यावेळी कोणतेही सरकार असो, आपण त्यांना पाठींबा दिला पाहिजे. जर त्यांना हवे असेल तर त्यांनी फोन केला पाहिजे. ही युती माध्यमांसमोर किंवा वर्तमानपत्रात बोलून होत नाही. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात,” असे अमित ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले ?

मनसे आणि ठाकरे गटातील युतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना, उद्धव गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एक सूचक विधान केले आहे. “आम्ही आमच्या बाजूने प्रतिसाद दिला आहे. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठी माणसांच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत येण्यास तयार असेल, त्याला आम्ही सोबत घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढू.

अलिकडेच आमचे नेते दीपेश म्हात्रे आणि मनसे नेते राजू पाटील यांनी एकत्रितपणे आंदोलन केले हे त्याचे उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मन स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत येण्यास तयार असेल, कोणताही पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्यासोबत एकत्र लढू,” असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more