पावसाळा यंदा लवकर आला पण आता मात्र तो चांगलाच सक्रिय झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मान्सून पूर्व तयारी सगळ्याचीच थोड्या अधिक प्रमाणात बाकी असेल. वाहनधारकांना (Two Wheeler) देखील पावसाळ्याआधी करायच्या दुरुस्ती अजून पूर्ण झाल्या नाहीयेत. त्यामध्येच सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली आहे. इंधनाच्या वाढत्या किमती पाहता, इलेक्ट्रिक वाहने आता समोर आली आहेत. पण पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांची जास्त काळजी घ्यावी लागते. आणि जर ती दुचाकी असेल तर त्याची आणखी जास्त काळजी घ्यावी लागते. एकामागून एक इलेक्ट्रिक स्कूटर (Two Wheeler) बाजारात दाखल झाले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी IP67 रेटिंगसह येते. पण पावसाळा आला असल्याने तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. पावसाळ्यात इलेक्ट्रिक स्कूटरची काळजी कशी घ्यावी ते पाहूया.
पावसाळ्यात मुंबईसारख्या शहरात मुसळधार पाऊस पडला तर लगेच पाणी साचू लागते. अलिकडे सर्वत्र मुसळधार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर चालकांनी रस्त्यावरील सखल भागात जाणे टाळावे. कारण इलेक्ट्रिक स्कूटरचे भाग खूप संवेदनशील असतात आणि त्यात पाणी शिरून नुकसान होऊ शकते. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये चार्जर हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्हाला पावसाळ्यात तुमचा चार्जर ओला होण्यापासून वाचवायचा असेल तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे. जर चार्जरमध्ये पाणी शिरले तर शॉर्ट सर्किट होऊ शकते. यामुळे नुकसान होऊ शकते आणि बॅटरी देखील खराब होऊ शकते, त्यामुळे अनावश्यक नुकसान होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात चार महिने ई-स्कूटर बॅटरीची काळजी घेणे आवश्यक आहे. या कारणास्तव, वेळोवेळी बॅटरी चार्ज करणे आवश्यक आहे. जर स्कूटरमधून विचित्र आवाज येत असेल तर तो ताबडतोब मेकॅनिकला दाखवावा. इलेक्ट्रिक वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च जास्त असू शकतो. म्हणून, स्कूटरचा विमा काढावा. पावसाळ्यात अनेक विम्यामध्ये नुकसान भरून काढले जात नाही. म्हणून, विमा काढताना, तुम्ही अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत आणि विमा काढण्याचा निर्णय घेतला पाहिजे.