शंकर जाधव (Dombivli)
सागाव (Dombivli) परिसरातील भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याच्या घटना सध्या वाढीस लागल्या असून, बाहेरून आलेल्या परप्रांतीय बिल्डर्सकडून गुंडगिरी व दबाव तंत्राचा वापर करून त्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, शनिवार, 7 जून रोजी सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहात भूमिपुत्रांच्या वतीने विशेष बैठक घेण्यात आली.
या बैठकीत भूमिपुत्रांनी एकत्र येऊन अन्यायाविरोधात संघर्ष करण्याचा ठराव केला. पोलीस यंत्रणेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचे आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या जमिनींचेही जबरदस्तीने ताबे घेतले जात असल्याचे निदर्शनास आले.
बैठकीत उपस्थित प्रमुख व्यक्ती:
संतोष केणे (सचिव, काँग्रेस महाराष्ट्र राज्य)
काळू कोमास्कर (अध्यक्ष, लाल बावटा रिक्षा युनियन)
You Might Also Like
मधुकर माळी (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस – कल्याण ग्रामीण)
राम म्हात्रे, दयानंद म्हात्रे (सामाजिक कार्यकर्ते)
प्रणव केणे, राहुल केणे, पदमाकर पाटील (उपाध्यक्ष – लाल बावटा रिक्षा यु.)
प्रेमनाथ पाटील, शशिकांत पाटील (अॅड.), शशिकांत पाटील (सामाजिक कार्यकर्ता)
या वेळी बोलताना संतोष केणे यांनी सांगितले, “भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आम्हाला एकत्र येऊन लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागेल. ही बैठक न्याय मिळवण्यासाठीचा पहिला टप्पा आहे.”
बैठकीत उपस्थित भूमिपुत्रांनी आपल्या समस्यांचा आढावा घेत गुंड प्रवृत्तीच्या बिल्डर्सकडून होत असलेली दडपशाही, परप्रांतीय टोळ्यांचा हस्तक्षेप यांविरोधात कडव्या लढ्याची भूमिका घेतली.