Dombivli: वर्षाला ५० लाख रुपयांचं वीजबिल भरूनही नागरिक त्रस्त; महावितरणकडून हलगर्जीपणा

माय मराठी
1 Min Read

 (शंकर जाधव)  (Dombivli)

होरायझॉन सभागृहाजवळील सर्वोदय आनंद सोसायटीतील  (Dombivli) १९२ घरांचे वीजग्राहक गेल्या काही महिन्यांपासून सतत होणाऱ्या लाईट फ्लक्चुएशनमुळे चिंतेत आहेत. महावितरण कंपनीने सोसायटीची कोणतीही परवानगी न घेता ट्रान्सफॉर्मरमधून हायटेंशन लाईन टाकल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. त्यामुळे घरातील इलेक्ट्रीक व इलेक्टॉनिक वस्तू खराब होत असून, संभाव्य शॉर्टसर्किटचा धोका कायम आहे.

सोसायटीचे सेक्रेटरी नारायण झा यांनी सांगितले की, “महावितरणकडे वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही दुर्लक्ष होत आहे. सोसायटीतून वर्षाला सुमारे ५० लाख रुपयांचं वीजबिल भरलं जात असूनही आम्हाला न्याय मिळत नाही. हायटेंशन लाईनमुळे इमारतीतील विद्युत उपकरणे सातत्याने बिघडत आहेत.”

सदस्या स्मिता वर्मा म्हणाल्या, “घरगुती वीज वापर मर्यादित असतानाही चौदा हजारांहून अधिक बिल येते. मीटर रीडिंग न घेता मनमानी प्रमाणावर बिल आकारलं जातं. वार्षिक अनामत रक्कम घेतली जाते, पण कोणतीही अतिरिक्त सेवा दिली जात नाही.”

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी पावसात विजेचे फ्लक्चुएशन होत असायचे, पण आता ते नेहमीचेच झाले आहे. घरात जेष्ठ नागरिक, लहान मुले असतात. दिवसाढवळ्या काही अनर्थ घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

महावितरणने सर्वोदय आनंद सोसायटीतील नागरिकांच्या समस्येकडे तातडीने लक्ष देत नुकसान भरपाई द्यावी, अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more