कसाराहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू (Breaking) झाला. ही घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकल ट्रेनमधून लटकलेले प्रवासी एक्सप्रेसने चिरडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये सहा जण कसारा-सीएसएमटी लोकल ट्रेनचे प्रवासी असल्याचेही समजते. हे प्रवासी दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान खाली पडले. पुष्पक एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून निघाली होती. लोकल ट्रेन कसाराहून सीएसएमटीला जात होती.
या लोकल ट्रेनच्या दाराशी लटकलेले प्रवासी एक्सप्रेस ट्रेनने चिरडले आणि त्यांचा तोल गेला.
मुंब्रा स्टेशनजवळ पाच प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. कसाराला जाणाऱ्या ट्रेनच्या गार्डने याबाबत माहिती दिली. प्रवासी कोणत्या ट्रेनमधून खाली पडले हे अद्याप कळलेले नाही. कसाराला जाणारी लोकल ट्रेन आणि पुष्पक एक्सप्रेस शेजारी शेजारी जात होती. त्यामुळे हे प्रवासी कोणत्या ट्रेनमधून पडले हे कळू शकलेले नाही,” अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
चालत्या ट्रेनमधून आणखी काही प्रवासी पडले असल्याची माहिती मिळत आहे. नेमके काय घडले याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हे प्रवासी ३०-३५ वयोगटातील असल्याचेही मानले जात आहे. ही घटना सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या घटनेवर भाष्य केले आहे. दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून एकूण ८ प्रवासी पडून काही लोकांचा मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी रुग्णालय आणि ठाणे जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधत आहे.
जखमींना लवकर आराम मिळावा अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. रेल्वे विभागाने या घटनेचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. या भयानक अपघाताच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे बोर्डाने आता निर्णय घेतला आहे. पहिला निर्णय म्हणजे नवीन गाड्या स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची व्यवस्था असेल. मुंबई उपनगरासाठी २३८ एसी लोकल गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. खरेदी केलेल्या गाड्या स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची प्रणालीसह येतील.