माय मराठी https://maaymarathi.com Fri, 06 Jun 2025 11:10:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Dombivli : शिवस्मारक नूतनीकरण सोहळा – रायगडाच्या हुबेहूब मेघडंबरीतील शिवमूर्तीचे भव्य अनावरण https://maaymarathi.com/dombivli-shiv-smarak-renovation-ceremony-grand-unveiling-of-the-shiva-idol-in-the-beautiful-meghdambari-of-raigad/ https://maaymarathi.com/dombivli-shiv-smarak-renovation-ceremony-grand-unveiling-of-the-shiva-idol-in-the-beautiful-meghdambari-of-raigad/#respond Fri, 06 Jun 2025 11:09:16 +0000 https://maaymarathi.com/?p=6061  शंकर जाधव (Dombivli)

डोंबिवली (Dombivli) शहरातील मानपाडा रोडवरील शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळ अनेक वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले असून, आता त्याजागी रायगड किल्ल्यावर असलेल्या मेघडंबरीतील हुबेहूब प्रतिमेची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून हे शिवस्मारक नव्या रूपात साकारले गेले आहे.

राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, डोंबिवलीत ढोल-ताशा, लेझीम, शिवगर्जना आणि पारंपरिक घोडेनृत्याच्या गजरात या ऐतिहासिक मूर्तीचे अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. शिवप्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

ही भव्य मूर्ती रायगडाच्या मेघडंबरीतील सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ प्रतिमेची हुबेहूब प्रतिकृती आहे. या मूर्तीच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या लोकार्पण सोहळ्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, पालिका आयुक्त अभिनव गोयल, शिवसेना आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, तसेच अनेक मान्यवर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

]]>
https://maaymarathi.com/dombivli-shiv-smarak-renovation-ceremony-grand-unveiling-of-the-shiva-idol-in-the-beautiful-meghdambari-of-raigad/feed/ 0
Shivsena : उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद, म्हणाले… https://maaymarathi.com/shivsena-positive-response-from-uddhav-thackeray-for-alliance-said/ https://maaymarathi.com/shivsena-positive-response-from-uddhav-thackeray-for-alliance-said/#respond Fri, 06 Jun 2025 10:45:51 +0000 https://maaymarathi.com/?p=6052 एकनाथ शिंदे (Shivsena) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सामील झालेल्या सुजाता शिंगाडे आज पुन्हा उद्धव ठाकरे गटात सामील झाल्या. पक्षप्रवेश सोहळा मातोश्री येथे पार पडला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “सुजाता ताईंनी त्यांच्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केल्या. त्या शिवसेना सोडणार हे ऐकून मला धक्का बसला. मला वाईट वाटले. ते ठीक आहे. तो इतिहास घडला आहे. लोक तिथे का जात आहेत हे तुम्ही जवळून पाहिले. तुम्हाला वाटले नव्हते की तुम्ही तिथे कोणाशीही जुळवून घ्याल. वातावरण विचित्र होते. काही लोक तिथे जातात. काहींना तिथे गेल्यानंतर पश्चात्ताप होतो. पण तुम्ही दाखवलेले धाडस आणि शौर्य फार कमी लोकांमध्ये दुर्मिळ असते. धाडस असहाय्य लोकांमध्ये राहत नाही. तुम्हाला अनुभव मिळाला आहे. तुम्ही आणखी कठोर परिश्रम कराल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मनसे आणि शिवसेना ठाकरे  (Shivsena) गटातील युतीबद्दल पत्रकारांनी विचारले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘बघा, महाराष्ट्रातील लोकांच्या मनात जे आहे ते होईलच’. या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात दिले. “आम्ही उर्वरित तपशीलांची तपासणी करत आहोत. सुजाता ताई आज आमच्या घरी आल्या आहेत. ही महत्त्वाची बातमी आहे. त्यांचा पुन्हा प्रवेश हा सर्व शिवसैनिकांसाठी संदेश आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मनसे-ठाकरे युतीबद्दल तुम्ही काय संदेश द्याल? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “संदेश का? मी तुम्हाला बातमी देईन. शिवसैनिकांच्या मनात माझा कोणताही गोंधळ नाही. त्यांचे सैनिकही आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये कोणताही गोंधळ नाही. आम्हाला जी बातमी द्यायची आहे ती आम्ही देऊ.”

संजय राऊत यांनी आज एक मोठे विधान केले की राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरे घर आहे. “आम्ही सकारात्मक आहोत, म्हणून तिथे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. तुम्हाला हे कसे समजत नाही? नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. आम्ही सकारात्मक आहोत. राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. ते खूप सकारात्मक असल्याने, जमिनीवरील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले असतील, मग त्याची काळजी का करायची?” राऊत म्हणाले.

]]>
https://maaymarathi.com/shivsena-positive-response-from-uddhav-thackeray-for-alliance-said/feed/ 0
Dombivli Update : धोकादायक इमारतीतच सरकारी कामकाज सुरू-कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला https://maaymarathi.com/government-work-continues-in-dangerous-building-employees-lives-hang-in-the-balance/ https://maaymarathi.com/government-work-continues-in-dangerous-building-employees-lives-hang-in-the-balance/#respond Thu, 05 Jun 2025 14:46:05 +0000 https://maaymarathi.com/?p=6046 शंकर जाधव (Dombivli Update)

कल्याणमधील  (Dombivli Update) सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू आणि सहा जण जखमी झाल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे. यानंतर धोकादायक इमारतींना नोटिसा देण्याचा आणि अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे स्वतःची सरकारी इमारतच धोकादायक ठरलेली असूनही त्यात अजूनही सरकारी कामकाज सुरूच आहे.

डोंबिवली (Dombivli Update) पश्चिमेकडील पु. भा. भावे सभागृह ही महापालिकेच्या मालकीची इमारत सध्या अतिधोकादायक स्थितीत असून, येथे महसूल विभागाची मंडळ अधिकारी ठाकुर्ली कार्यालय आणि तलाठी कार्यालय( Dombivli) (कार्यरत आहेत. दररोज शेकडो नागरिक कामासाठी येथे येतात आणि कर्मचारी जीव मुठीत धरून आपले काम करत आहेत.

स्थानांतरणाची मागणी – परंतु दुर्लक्ष कायम
तहसीलदार सचिन शेजाळ यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देत, या धोकादायक इमारतीतील कार्यालये इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली आहे. मात्र अद्याप ठोस हालचाल झालेली नाही.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संतोष केणे, प्रणव केणे आणि राहुल केणे यांनी ५ जून रोजी इमारतीची पाहणी करून मंडळ अधिकारी रविंद्र जमदारे आणि तलाठी कासार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांनी आपल्या सुरक्षेविषयीची चिंता मांडली. संतोष केणे यांनी याप्रकरणी लवकरच पालिका आयुक्तांची भेट घेण्याची घोषणा केली आहे.

धोकादायक इमारतींबाबत दुहेरी निकष?
केणे यांनी पालिकेवर टीका करताना सांगितले की, “महापालिका खाजगी धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास तत्पर असते, पण शासकीय आणि पालिकेच्या इमारतीबाबत मात्र दुर्लक्ष केले जाते.”

त्यांनी यावेळी अधोरेखित केले की, (Dombivli Update) या इमारतीत ठाकुर्ली, नवगाव, डोंबिवली, पाथर्ली, आयरे, भोपर, गावदेवी, काटई, संदप, उसरघर, कांचनगाव, कोपर आणि जुनी डोंबिवली या गावांचे महसूल कामकाज चालते. त्यामुळे ही इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

तातडीने निर्णय घ्या – काँग्रेसची मागणी
भावे सभागृहातील कार्यालयांसाठी दुसरी जागा तत्काळ उपलब्ध करून कर्मचाऱ्यांचे स्थलांतर करावे, अन्यथा संभाव्य दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

]]>
https://maaymarathi.com/government-work-continues-in-dangerous-building-employees-lives-hang-in-the-balance/feed/ 0
KDMC: कचरा शुल्कवाढ रद्द करा अन्यथा संघर्ष अनिवार्य! -मनसेचा केडीएमसीला इशारा https://maaymarathi.com/kdmc-cancel-the-garbage-fee-hike-otherwise-a-struggle-is-inevitable-mns-warns-kdmc/ https://maaymarathi.com/kdmc-cancel-the-garbage-fee-hike-otherwise-a-struggle-is-inevitable-mns-warns-kdmc/#respond Thu, 05 Jun 2025 14:27:04 +0000 https://maaymarathi.com/?p=6045  शंकर जाधव (KDMC)


कल्याण-डोंबिवली (KDMC) महापालिकेने नागरिकांवर लादलेल्या वाढीव घनकचरा संकलन शुल्काचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी (५ जून) महापालिका मुख्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला.

शहर स्वच्छतेसाठी महापालिकेने राबवलेल्या नव्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर हे शुल्क वाढवण्यात आले. मात्र, ही वाढ नागरिकांच्या आर्थिक कुवतीवर आघात करणारी असल्याने मनसेने याला जोरदार विरोध दर्शवला. मोर्चादरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन शुल्कवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.

या आंदोलनात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर, महिला जिल्हाध्यक्ष कस्तुरी देसाई, माजी नगरसेविका मंदा पाटील, कोमल पाटील, तसेच मनोज घरत, अरुण जांभाळे, संदीप (रमा) म्हात्रे आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान बोलताना अविनाश जाधव यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला की, “कल्याण-डोंबिवलीतील जनतेच्या खिशातून जबरदस्तीने पैसे उकळून ते कोणत्यातरी ठेकेदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न असेल, तर मनसे गप्प बसणार नाही. आजचा मोर्चा शांततेत झाला असला तरी पुढीलवेळी संताप उफाळल्यास प्रशासन जबाबदार असेल.”

मनसेच्या या आंदोलनामुळे केडीएमसी (KDMC) प्रशासनावर दबाव वाढला असून, नागरिकांना यामधून काहीसा दिलासा मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

]]>
https://maaymarathi.com/kdmc-cancel-the-garbage-fee-hike-otherwise-a-struggle-is-inevitable-mns-warns-kdmc/feed/ 0
Dombivli News : डोंबिवलीतील ‘हा’ महत्वाचा रस्ता आठ तास बंद https://maaymarathi.com/dombivli-news-this-important-road-in-dombivli-closed-for-eight-hours/ https://maaymarathi.com/dombivli-news-this-important-road-in-dombivli-closed-for-eight-hours/#respond Thu, 05 Jun 2025 11:34:20 +0000 https://maaymarathi.com/?p=6041 डोंबिवलीकरांसाठी  (Dombivli News ) एक महत्वाची बातमी समोर येत आहे, तुम्ही डोंबिवली पूर्वेला राहत असाल किंवा काही कामासाठी तुमचं तिकडे जाणे होणार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातील इंदिरा चौकाजवळील शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोरील मेघडंबरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण गुरुवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या काळात शिवसेना शाखेसमोर सार्वजनिक कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे पूर्व रेल्वे स्टेशन ते शिळफाटा, एमआयडीसीकडे जाणारा रस्ता आणि रेल्वे स्टेशनकडे येणारी वाहने आठ तासांसाठी बंद राहणार आहेत.

या काळात प्रवाशांनी परिवहन विभागाने ठरवलेल्या पर्यायी रस्त्याने जावे, अशी अधिसूचना वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी बुधवारी जारी केली आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनजवळ मानपाडा रोडवरील इंदिरा चौकाजवळ शिवसेना मध्यवर्ती शाखा आहे. या शाखेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. मेघडंबरी आणि या पुतळ्यावरील पुतळा परिसराचे नूतनीकरण कल्याण डोंबिवली नगरपालिकेने ७५ लाख रुपयांच्या सरकारी निधीतून पूर्ण केले आहे. खासदार डॉ. शिंदे यांना या पुतळ्यावर छत असावी अशी कल्पना होती. त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि या कामासाठी सरकारकडून ७५ लाख रुपयांचा निधी आणला.

गेल्या तीन महिन्यांपासून शिवसेना शाखेसमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत बसवण्याचे आणि परिसराचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीचा विचार करता, गुरुवारी संध्याकाळी या छतातील पुतळ्याचे अनावरण होत आहे. मानपाडा रोड पुतळ्यासमोरील परिसरातून गेला आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक, विविध संघटना आणि गट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या सूचनेनुसार, डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी गुरुवारी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी कार्यक्रम स्थळ परिसरातील रस्ते बंद केले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी प्रवाशांना प्रस्तावित पर्यायी रस्ता मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

डोंबिवली (Dombivli News ) पूर्वेकडील मानपाडा रोडवरील ग्रीन चौकातून रेल्वे स्टेशनजवळील इंदिरा चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ग्रीन चौकात बंद राहतील. ही वाहने ग्रीन चौकातून मानपाडा रोड आणि चिपळूणकर रोडवरून त्यांच्या इच्छित स्थळी जातील. डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनवरून इंदिरा चौक आणि मानपाडा रोडकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदिरा चौकात बंद राहतील. ही वाहने पी. पी. चेंबर्स मॉलहून भगतसिंग रोडकडे डावीकडे वळून सर्वेश सभेमार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जातील. अत्यावश्यक सेवांमधील रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या वाहनांना या रस्ता बंदमधून वगळण्यात आले आहे.

]]>
https://maaymarathi.com/dombivli-news-this-important-road-in-dombivli-closed-for-eight-hours/feed/ 0
Jawhar : समृद्धी महामार्गावर ‘जव्हार’ येथे इंटरचेंजला मंजुरी – विकासाला नवे दार उघडले! https://maaymarathi.com/approval-for-interchange-at-jawhar-on-samruddhi-highway-new-door-opened-for-development/ https://maaymarathi.com/approval-for-interchange-at-jawhar-on-samruddhi-highway-new-door-opened-for-development/#respond Thu, 05 Jun 2025 11:03:39 +0000 https://maaymarathi.com/?p=6037 जव्हार (Jawhar)

निसर्गसंपन्न आणि आदिवासीबहुल असलेल्या जव्हार तालुक्याच्या विकासासाठी एक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. स्थानिक नेतृत्व कॅप्टन विनीत मुकणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर समृद्धी महामार्गावर ‘जव्हार’ आणि ‘मोखाडा’ येथे इंटरचेंज मंजूर करण्यात आले आहे.

२७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आली होती आणि ती आता मान्य झाल्याने जव्हार व मोखाडा परिसरासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले झाले आहेत.

या विकासामुळे होणारे महत्त्वाचे फायदे:

जव्हार व मोखाडा तालुक्याचा समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क

दुर्गम व आदिवासी भागांसाठी अधिक सुलभ दळणवळण व आपत्कालीन वैद्यकीय सेवा

पर्यटन, शेतीमाल वाहतूक व उद्योगधंद्यांना चालना

आदिवासी मजुरांसाठी बारमाही रोजगाराच्या संधी

शिक्षण व आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध

वाडा ते घोटी दरम्यानच्या मार्गात हे इंटरचेंज तयार करण्यात येणार असून, यामुळे त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा आणि पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागाचा समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क साधला जाईल.

कॅप्टन विनीत मुकणे यांच्या प्रयत्नातून झालेल्या या निर्णयामुळे स्थानिक आदिवासी समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

]]>
https://maaymarathi.com/approval-for-interchange-at-jawhar-on-samruddhi-highway-new-door-opened-for-development/feed/ 0
Amit thackrey: युती माध्यमांसमोर किंवा वर्तमानपत्रात बोलून होत नाही असं अमित ठाकरे का म्हणाले ? https://maaymarathi.com/amit-thackrey-why-did-amit-thackeray-say-that-alliance-cannot-be-achieved-by-speaking-in-front-of-the-media-or-in-newspapers/ https://maaymarathi.com/amit-thackrey-why-did-amit-thackeray-say-that-alliance-cannot-be-achieved-by-speaking-in-front-of-the-media-or-in-newspapers/#respond Thu, 05 Jun 2025 07:00:49 +0000 https://maaymarathi.com/?p=6028 पर्यावरण दिनानिमित्त दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेने खिळेमुक्त वृक्ष मोहीम सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit thackrey)  यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. माध्यम प्रतिनिधींना उत्तर देताना अमित ठाकरे (Amit thackrey) यांनी मनसे आणि शिवसेना युतीवरही भाष्य केले. “दोन्ही भावांनी बोलले पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात.”

“माझी भूमिका अशी आहे की दोन्ही भावांनी बोलले पाहिजे. आपण बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र येण्याने मला काही हरकत नाही. मी २०१४, २०१७ मध्ये पाहिले आहे, कोरोना काळातही पाहिले आहे, कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज साहेबांनी पहिल्यांदा उद्धवजींना फोन केला होता. त्यावेळी कोणतेही सरकार असो, आपण त्यांना पाठींबा दिला पाहिजे. जर त्यांना हवे असेल तर त्यांनी फोन केला पाहिजे. ही युती माध्यमांसमोर किंवा वर्तमानपत्रात बोलून होत नाही. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात,” असे अमित ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले ?

मनसे आणि ठाकरे गटातील युतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना, उद्धव गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एक सूचक विधान केले आहे. “आम्ही आमच्या बाजूने प्रतिसाद दिला आहे. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठी माणसांच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत येण्यास तयार असेल, त्याला आम्ही सोबत घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढू.

अलिकडेच आमचे नेते दीपेश म्हात्रे आणि मनसे नेते राजू पाटील यांनी एकत्रितपणे आंदोलन केले हे त्याचे उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मन स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत येण्यास तयार असेल, कोणताही पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्यासोबत एकत्र लढू,” असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

]]>
https://maaymarathi.com/amit-thackrey-why-did-amit-thackeray-say-that-alliance-cannot-be-achieved-by-speaking-in-front-of-the-media-or-in-newspapers/feed/ 0
GS Mahanagar Co-operative Bank : जी.एस. महानगर बँकेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांनी घेतली उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांची भेट https://maaymarathi.com/directors-of-g-s-mahanagar-bank-met-deputy-chief-minister-ajit-pawar/ https://maaymarathi.com/directors-of-g-s-mahanagar-bank-met-deputy-chief-minister-ajit-pawar/#respond Thu, 05 Jun 2025 06:55:25 +0000 https://maaymarathi.com/?p=6029 जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (GS Mahanagar Co-operative Bank) २०२५ च्या संचालक मंडळ निवडणुकीत गीतांजली उदयराव शेळके (Geetanjali Udayrao Shelke) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत गीतांजली शेळके यांच्या पॅनेलने ८० टक्के मते मिळवून विरोधी पॅनेलच्या सुमनताई शेळके (Sumantai Shelke) यांच्या गटाचा पूर्णपणे धुव्वा उडवला. विशेष म्हणजे ही निवडणूक सासू विरोधात सून अशी होती. या निवडणुकीत गीतांजली शेळके यांच्या पॅनेलने बाजी मारली.

आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची देवगिरी निवासस्थानी जी.एस. महानगर बँकेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांसमवेत सदिच्छा भेट पार पडली. या भेटी प्रसंगी अजितदादांनी सर्व संचालक मंडळाला मोलाचे मार्गदर्शन केले. बँकेच्या आगामी वाटचालीसाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि सहकार क्षेत्रात बँकेने अधिक प्रगती साधावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

या प्रेरणादायी भेटीमुळे संचालक मंडळाला नवचैतन्य आणि उत्साह मिळाला असून, आम्ही आता अधिक जोमाने काम करत, आदरणीय सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब आणि आदरणीय उदयदादा यांच्या विचारधारेवर आधारित नेतृत्वात बँकेची घोडदौड निश्चितच पुढे नेऊ, अशी ग्वाही यावेळी संचालक मंडळाच्यावतीने दिली.

गीतांजली उदयराव शेळके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १८ जागांवर विजय मिळवला, ज्यामध्ये एक जागा बिनविरोध निवडून आली होती. गीतांजली शेळके यांच्या पॅनेलने सर्व मतदारसंघांमध्ये ८० टक्के मते मिळवली, तर सुमनताई शेळके यांच्या पॅनेलला केवळ २० टक्के मते मिळाली. ही एकतर्फी विजयाने गीतांजली शेळके यांच्यावरील भागधारकांचा विश्वास अधोरेखित झाला.

]]>
https://maaymarathi.com/directors-of-g-s-mahanagar-bank-met-deputy-chief-minister-ajit-pawar/feed/ 0
KDMC: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिकविरोधी जनजागृती रॅली https://maaymarathi.com/kdmc-anti-plastic-awareness-rally-on-world-environment-day/ https://maaymarathi.com/kdmc-anti-plastic-awareness-rally-on-world-environment-day/#respond Wed, 04 Jun 2025 13:40:40 +0000 https://maaymarathi.com/?p=6023 KDMC (शंकर जाधव)

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जून रोजी कल्याण येथील दुर्गाडी किल्ला ते आचार्य अत्रे रंगमंदिर मंदिर परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिकविरोधी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली.

“एकल प्लास्टिक वापर टाळा, कापडी पिशव्यांचा वापर करा” असा पर्यावरणरक्षणाचा संदेश रॅलीत देण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रिजनल ऑफिसर जयवंत हजारे, तंत्रज्ञ सल्लागार नंदकुमार गौरव, प्रो. पुरुषोत्तम काळे, पालिकेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रोहिणी लोकरे, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अध्यक्ष डॉ. देवेन् सोनी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

रॅलीदरम्यान ‘प्लास्टिक वापर नको, पर्यावरणाचा विचार करा’, ‘एक पृथ्वी-एक संधी’, ‘प्लास्टिकपासून मोकळी करू जमिनी’, ‘प्लास्टिक बंदी गरज आहे’, ‘स्वच्छ पृथ्वी, हिरवी पृथ्वी’, ‘प्लास्टिक मुक्त जीवनशैली’ असे विविध ठळक संदेश असलेले बॅनर उंचावण्यात आले.

नंतर आचार्य अत्रे रंगमंदिर सभागृहात पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले.

]]>
https://maaymarathi.com/kdmc-anti-plastic-awareness-rally-on-world-environment-day/feed/ 0
Kalyan : दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली आमदार भोईर ठेकेदारावर संतापले https://maaymarathi.com/kalyan-durgadi-forts-defensive-wall-collapsed-mla-bhoir-is-angry-with-the-contractor/ https://maaymarathi.com/kalyan-durgadi-forts-defensive-wall-collapsed-mla-bhoir-is-angry-with-the-contractor/#respond Wed, 04 Jun 2025 13:29:50 +0000 https://maaymarathi.com/?p=6019 Kalyan (शंकर जाधव)

कल्याण  (Kalyan) शहराची ऐतिहासिक शान असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीचा भाग बुधवारी (4 जून) पहाटेच्या सुमारास कोसळला. अवघ्या काही मिनिटांच्या पावसात भिंत कोसळल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गोविंदवाडी बायपासच्या दिशेने असलेली भिंत कोसळल्याची माहिती मिळताच आमदार विश्वनाथ भोईर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत दोषींसोबत कडक कारवाईची मागणी केली.

“पावसात काम सुरू ठेवण्याची गरज काय होती? भिंत कोसळून जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण?” असे संतप्त सवाल आमदार भोईर यांनी उपस्थित केले.

येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर येथे नमाजासाठी मोठी गर्दी होणार आहे, अशावेळी अशा दुर्घटनांचे गांभीर्य अधिकच वाढते.

कामाच्या निकृष्ट दर्जावर नाराजी व्यक्त करत आमदार भोईर यांनी ठेकेदाराला तातडीने उपस्थित राहण्याचा अल्टिमेटम दिला. जर ठेकेदार यायला तयार नसेल, तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवू, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि पुरातत्त्व विभाग यांच्यात जबाबदारीपासून पळ काढण्याची टोलवाटोलवी सुरु आहे.

]]>
https://maaymarathi.com/kalyan-durgadi-forts-defensive-wall-collapsed-mla-bhoir-is-angry-with-the-contractor/feed/ 0