महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Breaking News) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट ) एकत्र येण्याबाबत एक सूचक विधान केले होते. त्यानंतर या दोन्ही पक्षांमधील युतीची चर्चा सुरू झाली. नंतर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही माघार घेतली नाही. त्यांनीही राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही मनसेचे कौतुक केले आहे. “महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यास तयार आहोत, म्हणूनच आम्ही मनसेला अनुकूल उत्तर देणार आहोत,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंसोबतच शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आमदार अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू यांनीही वारंवार युतीला अनुकूलता दर्शविली आहे. तथापि, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दुसरा गट युतीच्या बाजूने नसल्याचे दिसून येते.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या युतीबाबतच्या विधानावर त्यांचे काका राज ठाकरे उत्तर देतील का? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्ही आमच्या बाजूने प्रतिसाद दिला आहे. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठी जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत येण्यास तयार असेल, त्याला आम्ही आमच्यासोबत घेऊ आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहू. परवा आमचे नेते दीपेश म्हात्रे आणि मनसे नेते राजू पाटील यांनी एकत्र निषेध आंदोलन केले, हे त्याचेच उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मनही स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत येण्यास तयार असेल, कोणताही पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्यासोबत एकत्र लढू”.
शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, “युतीच्या चर्चेवर कोणीही गप्प राहिलेले नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः त्यांची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या सहकाऱ्यांनी नाही. त्यांचे भाऊ उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या इच्छेवर अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यानंतर, आम्ही सर्वांनीही योग्य भूमिका घेतली आहे. त्यामुळे, तुमच्या मनात काय आहे ते लवकरच कळेल.”