नवीन अंतिम तारीख – २६ मे २०२५ | पहिली गुणवत्ता यादी – २७ मे २०२५
Mumbai University– राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत, शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त संस्थांमध्ये पदवीच्या ३ व ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेस २६ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mu.ac.in/admission या लिंकवर जाऊन नावनोंदणी करावी लागेल. ही प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार राबवली जात आहे.
नोंदणीचा आढावा:
एकूण नावनोंदणी: २,२५,५५६
अर्ज केलेले विद्यार्थी: १,४५,०८७
प्राप्त अर्जांची संख्या: ५,०९,५७८
You Might Also Like
प्रवेशासाठी अनिवार्य अभ्यासक्रम: (अनुदानित व विनाअनुदानित अभ्यासक्रम)
कला, वाणिज्य, विज्ञान व अन्य शाखा:
बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम., बी.एसडब्ल्यू, बीएमएस, बीएएमएमसी, बीकॉम (विविध शाखा), बीएस्सी (IT, CS, डेटा सायन्स, एव्हिएशन, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इ.), बी.व्होक. (विविध कौशल्य विषय), इंटिग्रेटेड कोर्सेस (बीए-एमए), बीपीए (संगीत/नृत्य), बी.म्युझिक, एफवाय बी.लायब्ररी सायन्स इत्यादी.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीचे सुधारित वेळापत्रक:
क्र. | टप्पा | कालावधी |
---|---|---|
1 | अर्ज विक्री (ऑनलाईन/ऑफलाइन) | ८ मे ते २६ मे, दुपारी १:०० |
2 | ऑनलाईन नावनोंदणी | ८ मे ते २६ मे, दुपारी १:०० |
3 | ऑनलाईन अर्ज सादर करणे | ८ मे ते २६ मे, दुपारी १:०० |
4 | पहिली गुणवत्ता यादी | २७ मे, संध्याकाळी ५:०० |
5 | कागदपत्र पडताळणी व शुल्क भरणे (पहिली यादी) | २८ मे ते ३० मे, दुपारी ३:०० |
6 | दुसरी गुणवत्ता यादी | ३१ मे, संध्याकाळी ७:०० |
7 | कागदपत्र पडताळणी व शुल्क भरणे (दुसरी यादी) | २ जून ते ४ जून, दुपारी ३:०० |
8 | तिसरी गुणवत्ता यादी | ५ जून, सकाळी ११:०० |
9 | कागदपत्र पडताळणी व शुल्क भरणे (तिसरी यादी) | ६ जून ते १० जून, दुपारी ३:०० |
10 | वर्गांची सुरुवात/ओरिएंटेशन | १३ जून २०२५ |
प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व महाराष्ट्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवले जातील. सर्व संलग्न आणि स्वायत्त महाविद्यालयांनी याच वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया पार पाडावी. प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षण धोरण आणि पात्रतेच्या अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले आहे.