डोंबिवली ( शंकर जाधव )
काश्मीरच्या पेहलगाम (Pahalgam) येथील बैसरन व्हॅली येथील दुर्दैवी आणि भ्याड अतिरेकी हल्ल्यात डोंबिवली पश्चिमेतील तीन मराठी युवक मारले गेले.संजय लक्ष्मण लेले ( ५२ वर्षे) राहणार विजयश्री अपार्टमेंट,सुभाष रोड, नवापाडा, हेमंत जोशी ( रा. सावित्री बिल्डिंग, भागशाळा मैदान, डोंबिवली पश्चिम व अतुल मोने ( रा. श्रीराम अंचल, सम्राट चौक, डोंबिवली पश्चिम ) हे तिघे एकत्र आपल्या कुटुंबीयांसोबत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. (Pahalgam)
संजय लेले ह्यांचे पुत्र हर्षल लेले वय वर्षे २० याला अतिरिक्यांची गोळी हाताच्या बोटाला लागून किरकोळ जखमी झाले. संजय ह्यांची पत्नी कविता, अतुल यांची पत्नी अनुष्का व १६ वर्षाची मुलगी रुचा व हेमंत जोशी वय यांची पत्नी मोनिका व १५ वर्षांचा मुलगा ध्रुव असे ६ जण सुखरुप आहेत, परंतु दुर्दैवाने एकाच कुटुंबातील ३ डोंबिवलीकर मात्र ह्या भ्याड हल्ल्यात शहिद झाले.
ह्या परिस्थितीत कुमार हर्षल लेले ह्या २० वर्षाच्या युवकाने सर्व गांभिर्य लक्षात येताच आपले दुःख गिळून ह्या तीनही कुटुंबीयांना संभाळून अगदी धीराने आलेल्या संकटाचा सामना करत आहे. त्याच्या समोर त्याचे वडील व २ मामा ह्यांना निर्दयी अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या, हॉस्पिटल, पोलीस यंत्रणा,शवागृह, पोस्ट मार्टम ह्या सगळ्या बाबी धीरोधात्त पणे सामोरे जाऊन तो व त्यांचे आई,मावशी व भावंडे अशी कुटुंबीय काश्मीर मध्ये अनोळखी ठिकाणी संकटाशी सामना करत आहे.भारत सरकार, भारतीय सैन्यदल, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, नागरिक ह्यांची मदत होत आहे.
त्याच बरोबर ह्या यंत्रणेच्या संपर्कात राहून ह्या कुटुंबीयांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे ह्यांनी त्वरित मदत करून त्यांचे दिल्लीला गेलेले स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर ह्यांना श्रीनगरला रवाना केले होते व सर्वोतोपरी मदत करण्यास सांगितले आहे, राजेश कदम ह्यांचे सह इतर लेले व मोने कुटुंबीय सुधा बुधवार 23 तारखेला पहाटे श्रीनगरला रवाना झाले होते. त्यांच्या सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांची एक टीम तेथील पुढील मदतीसाठी गेली होती.
डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र चव्हाण,कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश मोरे आणि ठाणे जिल्हा अधिकारी शिनगारे, कल्याण प्रांत गोसावी,डीसीपी अतुल झेंडे, कल्याण तहसीलदार, हे देखील ह्या दुर्दैवी कुटुंबीयांच्या मदतीसाठी सतत संपर्कात होते. निष्पाप पर्यटक नागरिकांवर झालेल्या अतिरेकी हल्यात तीन निष्पाप, साधे, सामान्य कुटुंबीयातील डोंबिवलीकर उमदे तरुण गमावून बसलो व त्यांचे कुटुंबीय पोरके झाले. हा काळा दिवस डोंबिवलीकर कायम लक्षात राहील.