डोंबिवली ( शंकर जाधव)
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका दहा वर्ष उलटली तरी पार पडल्या. प्रशासकीय राजवट असल्याने निवडणुका कधी होणार यावर राजकीत पक्षच नव्हे तर समान्य नागरिकांनी विचार पडला होता. आता या निवडणुका काही महिन्यात होण्याची शक्यता आल्याने महायुतीतील दोन पक्षानी महायुतीची सत्ता कशी येईल यावर चर्चा केली का? या बैठकीमागे नेमक काय राजकीय रणनीती आखली जातेय का? असा प्रश्न पडला आहे. शनिवार 17 तारखेला शिवसेना (Shivsena) डोंबिवली शहर शाखेत आमदार राजेश मोरे व भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदु परब यांची बैठक पार पडली. वास्तविक ही बैठक रविवार होणाऱ्या तिरंगा रॅलीच्या नियोजनाबाबत घेतली असली तरी त्या विषयाबरोबर पालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली का असा प्रश्न कार्यकर्ते व नागरिकांना पडला आहे.
2022 साली महाराष्ट्र राज्यात राजकीय भूकंप होऊन शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आली. तर राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी शरद पवार यांचे कडे न राहता अजित पवार यांच्याकडे आली. राज्यात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे महायुती सरकार सत्तेत आले. मात्र राज्यात सत्ता आली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही होत नव्हत्या. मुबंई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण -डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर पालिकेच्या निवडणूका काही वर्ष न झाल्याने प्रशासकीय राजवट आहे. आता या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाल्याने लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात महायुतीची सत्ता आली आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपलीच सत्ता यावी याकरिता तिन्ही राजकीय पक्षानी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे अशी चर्चा रंगली आहे. भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब यांनी पदभार घेतल्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसेल असा विश्वास व्यक्त केला.
सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या असे आदेश निवडणूक आयोगाला दिल्यामुळे आता प्रत्येक शहरात निवडणुकीचे वातावरण रंगात आले आहे. ही पालिका निवडणूक महायुती व महाआघाडी यांच्यातच खेळायची असे आराखडे बांधले जात आहेत. मात्र या निवडणुकीत आपापले उमेदवार विजयी होण्यासाठी सर्व प्रकारची रणनीती वापरायची या सध्या नियमाची आठवण करून देण्यात आली असावी. या दोघांच्या भेटीमुळे महायुतीत ताबडतोब निवडणुकीच्या कामासाठी कार्यकर्ते लागतील असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शहरात विकास कामाचे भूमिपूजन करण्यासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे येणारी पालिका निवडणूक रंगतदार होईल यात शंका नाही.