AC Local Mumbai – माय मराठी https://maaymarathi.com Tue, 10 Jun 2025 08:08:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png AC Local Mumbai – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Harbour local : ट्रान्स हार्बरची प्रवासी क्षमता आता आवाक्याबाहेर पण… https://maaymarathi.com/harbour-local-trans-harbours-passenger-capacity-is-now-out-of-reach-but/ https://maaymarathi.com/harbour-local-trans-harbours-passenger-capacity-is-now-out-of-reach-but/#respond Tue, 10 Jun 2025 08:08:18 +0000 https://maaymarathi.com/?p=6135 कालच्या दिवा-मुंब्रा अपघातानंतर रेल्वे प्रशासनला सगळ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. आतापर्यत प्रत्येक अपघाताचा इतिहास माध्यमांच्या  (Harbour local)मार्फत त्यांच्या समोर आणला जातोय. विरोधकांनी देखील आपापल्या परीने आंदोलन आणि मुद्दे मांडायला सुरुवात केली. अशातच ट्रान्स हार्बर मार्गावर होत असलेल्या वाढत्या प्रवाशांचा प्रश्न देखील समोर आला आहे.

नवी मुंबई शहरातील शहरीकरण आणि व्यावसायिक कंपन्यांच्या वाढीसह, ठाणे ते वाशी आणि पनवेल (Harbour local) अशी रेल्वे वाहतूक येथे सुरू झाली. नवी मुंबईतील स्थानके सिडकोमार्फत बांधण्यात आली. पूर्वी ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांना कधीही कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. परंतु गेल्या काही वर्षांत तांत्रिक बिघाडांसह विविध कारणांमुळे येथील समस्या देखील वाढू लागल्या आहेत. त्यामुळे ट्रान्स हार्बरची प्रवासी क्षमता आता त्याच्या आवाक्याबाहेर गेली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई शहरात, ऐरोली, रबाळे, सानपाडा, तुर्भे, वाशी, पनवेल या भागात शहरीकरण वाढले आहे. तसेच, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये स्थापन झाली आहेत. नवी मुंबई हे मुंबई आणि ठाणे शहराच्या जवळचे शहर असल्याने, येथे नवीन रहिवाशांची संख्या देखील वाढली आहे. ट्रान्स हार्बर मार्ग सुरू झाल्यानंतर, कर्जत, कसारा, कल्याण भागातील कामगार नोकरीच्या संधींसाठी या भागात येऊ लागले.

पूर्वी, ट्रान्स हार्बर मार्गावर बिघाड झाला तर त्याचा परिणाम इतका होत नव्हता. परंतु गेल्या काही वर्षांत ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच बिघाडाच्या समस्याही वाढल्या आहेत. येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सकाळी आणि रात्रीच्या वेळी गर्दीचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी येथील रेल्वे सेवा सुमारे साडेचार तास बंद होती. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना रस्त्याच्या मार्गाचा वापर करावा लागला. ही घटना एक महिन्यापूर्वी घडली. त्यानंतर पुन्हा एकदा त्याचा परिणाम जाणवला. नेरुळ येथे तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आता ट्रान्स हार्बरमध्ये रडगाणे सुरू झाल्याचे चित्र आहे. येथील प्रवासी क्षमता क्षमतेपेक्षा जास्त झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

]]>
https://maaymarathi.com/harbour-local-trans-harbours-passenger-capacity-is-now-out-of-reach-but/feed/ 0