Railway technical fault – माय मराठी https://maaymarathi.com Tue, 10 Jun 2025 08:08:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png Railway technical fault – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Harbour local : ट्रान्स हार्बरची प्रवासी क्षमता आता आवाक्याबाहेर पण… https://maaymarathi.com/harbour-local-trans-harbours-passenger-capacity-is-now-out-of-reach-but/ https://maaymarathi.com/harbour-local-trans-harbours-passenger-capacity-is-now-out-of-reach-but/#respond Tue, 10 Jun 2025 08:08:18 +0000 https://maaymarathi.com/?p=6135 कालच्या दिवा-मुंब्रा अपघातानंतर रेल्वे प्रशासनला सगळ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. आतापर्यत प्रत्येक अपघाताचा इतिहास माध्यमांच्या  (Harbour local)मार्फत त्यांच्या समोर आणला जातोय. विरोधकांनी देखील आपापल्या परीने आंदोलन आणि मुद्दे मांडायला सुरुवात केली. अशातच ट्रान्स हार्बर मार्गावर होत असलेल्या वाढत्या प्रवाशांचा प्रश्न देखील समोर आला आहे.

नवी मुंबई शहरातील शहरीकरण आणि व्यावसायिक कंपन्यांच्या वाढीसह, ठाणे ते वाशी आणि पनवेल (Harbour local) अशी रेल्वे वाहतूक येथे सुरू झाली. नवी मुंबईतील स्थानके सिडकोमार्फत बांधण्यात आली. पूर्वी ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांना कधीही कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. परंतु गेल्या काही वर्षांत तांत्रिक बिघाडांसह विविध कारणांमुळे येथील समस्या देखील वाढू लागल्या आहेत. त्यामुळे ट्रान्स हार्बरची प्रवासी क्षमता आता त्याच्या आवाक्याबाहेर गेली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई शहरात, ऐरोली, रबाळे, सानपाडा, तुर्भे, वाशी, पनवेल या भागात शहरीकरण वाढले आहे. तसेच, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये स्थापन झाली आहेत. नवी मुंबई हे मुंबई आणि ठाणे शहराच्या जवळचे शहर असल्याने, येथे नवीन रहिवाशांची संख्या देखील वाढली आहे. ट्रान्स हार्बर मार्ग सुरू झाल्यानंतर, कर्जत, कसारा, कल्याण भागातील कामगार नोकरीच्या संधींसाठी या भागात येऊ लागले.

पूर्वी, ट्रान्स हार्बर मार्गावर बिघाड झाला तर त्याचा परिणाम इतका होत नव्हता. परंतु गेल्या काही वर्षांत ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच बिघाडाच्या समस्याही वाढल्या आहेत. येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सकाळी आणि रात्रीच्या वेळी गर्दीचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी येथील रेल्वे सेवा सुमारे साडेचार तास बंद होती. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना रस्त्याच्या मार्गाचा वापर करावा लागला. ही घटना एक महिन्यापूर्वी घडली. त्यानंतर पुन्हा एकदा त्याचा परिणाम जाणवला. नेरुळ येथे तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आता ट्रान्स हार्बरमध्ये रडगाणे सुरू झाल्याचे चित्र आहे. येथील प्रवासी क्षमता क्षमतेपेक्षा जास्त झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

]]>
https://maaymarathi.com/harbour-local-trans-harbours-passenger-capacity-is-now-out-of-reach-but/feed/ 0
Mumbai Local : तेच.. तेच… वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होण्यास अडथळा https://maaymarathi.com/mumbai-local-same-same-air-conditioned-locals-doors-are-obstructed-from-closing/ https://maaymarathi.com/mumbai-local-same-same-air-conditioned-locals-doors-are-obstructed-from-closing/#respond Tue, 10 Jun 2025 07:41:03 +0000 https://maaymarathi.com/?p=6131 काल जो मध्य रेल्वेवर मुंब्रा-दिवा (Mumbai Local) दरम्यान अपघात झाला, त्यातून अजूनही रेल्वे ने काही धडा घेतलेले दिसत नाहीये. सर्व बाजूने टीका होत असताना देखील रेल्वे आपल्या वेळा आणि तांत्रिक बिघाड याचा समतोल राखण्यास वारंवार अयशस्वीच ठरतेय. आज १० जून रोजी सकाळी वातानुकूलित लोकल डब्याच्या दाराजवळ नेहमीच प्रवाशांची गर्दी असते, त्यामुळे वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होण्यास अडथळा निर्माण झाला. मात्र दरवाज्यांजवळील पिवळे दिवे चमकू लागले तरी लोकल ट्रेनचे दरवाजे बंद होत नव्हते. कोणताही प्रवासी दरवाज्यांमधून बाहेर पडण्यास तयार नव्हता. त्यामुळे दरवाजे बंद करण्यात अडथळे येत होते. प्लॅटफॉर्मवरील रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी काही प्रवाशांना दरवाज्यांमधून आत ढकलले. तर दारांवर लटकलेल्या काही प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी दरवाज्यांमधून बाहेर काढून प्लॅटफॉर्मवर आणले.

बहुतेक दरवाज्यांवर असे गर्दीचे दृश्य दिसून आले. ज्या डब्यांचे दरवाजे बंद होत नव्हते त्या डब्यांमधील प्रवाशांना जबरदस्तीने डब्यात उतरवण्याचे काम रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले होते. ही कारवाई होईपर्यंत, मंगळवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर वातानुकूलित लोकल (Mumbai Local)  ट्रेन दहा मिनिटे उशिराने धावत होती. वातानुकूलित लोकल ट्रेनला झालेल्या उशिरामुळे या लोकल ट्रेनच्या मागे येणारी लोकल ट्रेन ठाकुर्ली आणि कल्याणच्या दिशेने उशिराने धावत होती. दहा मिनिटांनी, वातानुकूलित लोकल ट्रेनचे डबे बंद झाल्यानंतर, लोकल ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

वातानुकूलित लोकलमध्ये बसण्यासाठी जागा नसली तरी, प्रवाशांना गर्दीच्या वातावरणात एकाच ठिकाणी उभे राहण्याचा आराम मिळतो. त्यामुळे बहुतेक प्रवासी वातानुकूलित लोकलला प्राधान्य देतात. सकाळी वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. सकाळी या लोकल गाड्यांमध्ये रेल्वे तिकीट तपासणाऱ्यांची संख्या कमी असते. सामान्य लोकल तिकिटे असलेले काही प्रवासी ठाणे, घाटकोपर, दादर येथे वातानुकूलित लोकल गाड्यांमध्ये प्रवास करतात.

मनसेने केला निषेध

मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रचंड निषेध केला. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक असा मनसेचा मोर्चा निघाला होता. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाणेकर आणि रेल्वे प्रवाशांसह मनसेचे अविनाश जाधव यांनीही या मोर्चात सहभाग घेतला आहे. “दररोज वीस प्रवासी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. यावर उपाय शोधून लवकरात लवकर योजना राबवण्याचा इशारा आम्ही रेल्वे प्रशासनाला दिला आहे. गेल्या १५ वर्षांत रेल्वे अपघातात ५१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण,” असा सवाल अविनाश जाधव यांनी केला. तीन महिन्यांपूर्वी लेखी पत्रात संभाव्य अपघाताची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी, त्यावर काय कारवाई करण्यात आली याची लेखी माहिती रेल्वे प्रशासनाने सादर करावी अशी मागणीही मनसेने केली.

]]>
https://maaymarathi.com/mumbai-local-same-same-air-conditioned-locals-doors-are-obstructed-from-closing/feed/ 0