Stay Updated – माय मराठी https://maaymarathi.com Mon, 24 Mar 2025 06:32:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://maaymarathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Maay-Marathi-1-32x32.png Stay Updated – माय मराठी https://maaymarathi.com 32 32 Auto Care Tips : किती असते इंजिन ऑइलची लाईफ? खराब ऑईल देईल खिशाला झटका.. https://maaymarathi.com/auto-care-tipswhat-is-the-life-of-engine-oil/ https://maaymarathi.com/auto-care-tipswhat-is-the-life-of-engine-oil/#respond Mon, 24 Mar 2025 06:23:37 +0000 https://maaymarathi.com/?p=5109 ऑईल वाहनाच्या इंजिनमधील योग्य वेळी बदलणे जास्त (Auto Care Tips) गरजेचे असते. याकडे जर दुर्लक्ष केले तर वाहनाची लाईफ देखील कमी होऊ लागते. खराब इंजिन ऑईलमुळे (Engine Oil) वाहनांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रतिकूल परिणाम होतो. वाहनाचा मायलेज देखील कमी होतो. आता जर वाहनाचे इतके नुकसान होणार असेल तर वेळच्या वेळी इंजिन ऑईल बदलणे फायद्याचे ठरेल.

तुम्ही जर वाहन चालवत असाल आणि तुम्हाला इंजिन ऑईल कधी बदलायचे याची माहिती नसेल तर अडचणी येऊ शकतात. गाडीच्या मायलेज आणि कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण इंजिन ऑईलची देखील लाईफ (Engine Oil) असते. याबाबत तुम्हाला जास्त माहिती नसेल तर आज आपण याबाबत माहिती घेऊ या..

Car Engine Oil

कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटर मधून जर वाहनाची सर्व्हिसिंग केली तर पुढील सर्व्हिसिंग कधी करायची याची माहिती वाहन मालकाला दिली जाते. साधारण दहा हजार किलोमीटर चालल्यानंतर सर्व्हिसिंग करा असे सांगितले जाते. म्हणजेच सर्विस सेंटरचा असा अंदाज असतो की इंजिन ऑईलची लाईफ दहा हजार किलोमीटर पर्यंत आहे. यानंतर कारच्या इंजिनमधील ऑईल बदलावे लागते.

Bike Engine Oil

दुचाकी किंवा स्कूटरची सर्व्हिसिंग करताना इंजिनमध्ये ऑईल टाकले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का या ऑईलची लाईफ नेमकी किती आहे. साधारण दोन हजार किंवा जास्तीत जास्त अडीच हजार किलोमीटर झाल्यानंतर पुन्हा सर्व्हिसिंग करा असे सर्विस सेंटरकडून सांगितले जाते. याचा अर्थ असा की अधिकृत सर्व्हिस सेंटर चालकांना वाटते की दुचाकी अडीच हजार किलोमीटर चालल्यानंतर ऑईलची लाईफ संपते.

ऑईल चेंज केलेच नाही तर काय होईल

जर तुम्ही योग्य वेळी वाहनातील ऑईल बदलले नाही तर याचा परिणाम वाहनाच्या कार्यक्षमतेवर होतो. जर वाहनाचा परफॉर्मन्स कमी झाला तर याचा परिणाम मायलेज वर देखील होईल. यामुळे जास्त पेट्रोलचा वापर लागेल. सध्या पेट्रोलच्या किमती (Petrol Price) पाहिल्या तर ही गोष्ट नक्कीच परवडणारी नाही. त्यामुळे कारमधील इंजिन ऑईल कधी बदलायचे याची माहिती घेऊन त्यानुसार वेळेवर वाहनातील ऑईल बदलत राहिले तर वाहन व्यवस्थित राहील.

]]>
https://maaymarathi.com/auto-care-tipswhat-is-the-life-of-engine-oil/feed/ 0
Kalyan : कल्याण-टिटवाळा परिसरात बेकायदा चाळींवर महापालिकेची धडक कारवाई https://maaymarathi.com/municipal-corporation-takes-strict-action-against-illegal-shanties-in-kalyan-titwala-area/ https://maaymarathi.com/municipal-corporation-takes-strict-action-against-illegal-shanties-in-kalyan-titwala-area/#respond Wed, 12 Mar 2025 14:03:30 +0000 https://maaymarathi.com/?p=4804 कल्याण (Kalyan) – टिटवाळा आणि बल्याणी भागातील तसेच डोंगरवाली मैय्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळी उभारल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने मंगळवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ६० बेकायदा चाळी आणि त्यांची बांधणी सुरू असलेल्या जोत्यांवर बुलडोझर चालवण्यात आला.

अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना बल्याणी भागात गुपचूप बेकायदा चाळी बांधल्या जात असल्याची माहिती मिळाली. तपासात असे समजले की, डोंगरवाली मैय्या मंदिर परिसरात आणि बल्याणी टेकडीवर ६० हून अधिक चाळींसाठी जोत्यांचे बांधकाम सुरू होते. यामुळे तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी महापालिका अधिकाऱ्यांसह तोडकाम पथक, जेसीबी मशीन आणि पोलिस बंदोबस्त घेऊन ही कारवाई करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या या कारवाईने भूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ माजली आणि ते पळून गेले.

रेशन धारकांसाठी मोठी बातमी, आता KYC करा …

बल्याणी टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणावर सरकारी आणि वनजमीन आहे. भूमाफियांनी या जमिनींवर कब्जा मिळवण्यासाठी चाळी उभारण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी आधी जोत्यांचे बांधकाम केले जात होते, जेणेकरून भविष्यात येथे चाळी उभारता येतील. या भागात अनेकजण जमीन हडप करण्यासाठी स्पर्धा करत होते, असे स्थानिकांनी अधिकाऱ्यांना सांगितले. गेल्या दीड महिन्यापासून टिटवाळा, मांडा, अटाळी, मोहने परिसरात बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू आहे. या मोहिमेद्वारे सुमारे १५०० हून अधिक बेकायदा चाळी, जोते आणि व्यापारी गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. स्थानिकांच्या मते, टिटवाळ्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जात आहे.

ही बेकायदा बांधकामे प्रामुख्याने राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यावर उभी राहिली होती. मात्र, कारवाईला भीतीपोटी आता हे सर्व लोक गायब झाले आहेत. जो कोणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. बेकायदा बांधकामधारकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याअंतर्गत (MRTP Act) गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

]]>
https://maaymarathi.com/municipal-corporation-takes-strict-action-against-illegal-shanties-in-kalyan-titwala-area/feed/ 0
रेशन धारकांसाठी मोठी बातमी, आता KYC करा … https://maaymarathi.com/big-news-for-ration-holders-do-kyc-now/ https://maaymarathi.com/big-news-for-ration-holders-do-kyc-now/#respond Wed, 12 Mar 2025 12:07:57 +0000 https://maaymarathi.com/?p=4792 राज्यभरात अनेक शिधापत्रिका धारकांनी अद्याप ई-केवायसी (KYC) केलेले नाही, त्यामुळे सरकारने “मेरा ई-केवायसी” अ‍ॅप विकसित केले आहे. या नव्या सुविधेमुळे अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थी घरबसल्या ई-केवायसी करू शकतात, जे रेशन मिळण्यासाठी आवश्यक आहे. आतापर्यंत आधार प्रमाणीकरण करताना अनेक अडचणी येत होत्या. वृद्ध आणि लहान मुलांचे बोटांचे ठसे व डोळ्यांचे स्कॅन व्यवस्थित होत नव्हते. तसेच, कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे रेशन दुकानात तासन्‌तास थांबावे लागत होते. शासनाने ई-केवायसी अनिवार्य केल्याने अनेक लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. मेरा ई-केवायसी अ‍ॅपमुळे ही समस्या सुटणार आहे.

https://maaymarathi.com/budget-maharashtra-state-budget-2025-26-important-policies-and-funds-for-development/

या अ‍ॅपद्वारे लाभार्थ्यांना घरबसल्या मोबाईलद्वारे ई-केवायसी करता येणार आहे. यात चेहऱ्याच्या पडताळणीद्वारे प्रमाणीकरण करता येईल, त्यामुळे बायोमेट्रिक स्कॅनची गरज भासणार नाही. मात्र, यासाठी मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. ही सुविधा सध्या फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. रेशनकार्ड धारकांसाठी आधार प्रमाणीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शासनाच्या नियमानुसार ई-केवायसी पूर्ण न झाल्यास रेशन मिळणार नाही.

रायगड जिल्ह्यात सुमारे ५ लाख लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे, तसेच राज्यभरातील परिस्थितीही वेगळी नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, जेणेकरून कोणीही आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहू नये. जर तुमच्या कुटुंबाचे ई-केवायसी अद्याप झाले नसेल, तर त्वरित “मेरा ई-केवायसी” अ‍ॅपद्वारे करा आणि तुमच्या हक्काचे रेशन मिळवा.

]]>
https://maaymarathi.com/big-news-for-ration-holders-do-kyc-now/feed/ 0