शंकर जाधव (Dombivli)
कल्याण-डोंबिवली (Dombivli)परिसरात शनिवार सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे अनेक भागात पाणी साचण्याची समस्या उभी राहिली आहे. विशेषतः डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात केवळ एका तासाच्या पावसात रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाजवळील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाहतुकीत मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक रहिवाशांनी महापालिकेच्या नियोजनातील चुकांवर आणि हलगर्जी कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून नेण्यासाठी आवश्यक नाले साफसफाई आणि योग्य नियोजन झाल्यासारखे दिसत नाही.