रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर आयपीएल २०२५ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. आरसीबीचे १७ हंगामांचे स्वप्न पूर्ण होत होते. या १७ वर्षांत तीन वेळा विजेतेपद जिंकण्याची संधी होती. पण त्यांना तिन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला. पण १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद जिंकले. विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होताना पाहून विराट कोहलीला Virat Kohli अश्रू अनावर झाले. पंजाब किंग्जला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी २९ धावांची आवश्यकता होती. विराट कोहलीसह संपूर्ण संघ तणावात होता. जोश हेझलवूड शेवटचा षटक टाकण्यासाठी मैदानात आला. पहिले दोन चेंडू एकही धाव न घेता टाकल्यानंतर विराट कोहलीला विजयाचा आत्मविश्वास वाटला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहत होते. गेल्या १७ वर्षांपासून वाट पाहत असलेले स्वप्न पूर्ण होताना पाहून विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. प्रत्येक चेंडूनंतर विजय निश्चित होत होता आणि विराट कोहली भावनिक होत होता.
विराट कोहली म्हणाला, ‘हा विजय चाहत्यांसाठी जितका आहे तितकाच तो संघासाठी आहे. मी या संघाला माझे तारुण्य, शौर्य आणि अनुभव दिला आहे. मी प्रत्येक हंगाम जिंकण्याचा प्रयत्न केला, मी माझ्या परीने सर्व काही दिले. हा दिवस येईल असे मला कधीच वाटले नव्हते, विजयानंतर आम्ही भावनेने भारावून गेलो होतो. एबीडीने फ्रँचायझीसाठी जे केले ते आश्चर्यकारक आहे, त्याला सांगणे की ‘हे जितके तुमचे आहे तितकेच आमचे आहे’. निवृत्तीच्या चार वर्षांनंतरही, तो बहुतेक वेळा फ्रँचायझीमध्ये पीओटीएम राहिला आहे. तो कप उचलून पोडियमवर उभा राहण्यास पात्र आहे. हा विजय सर्वोच्च दर्जाचा आहे, मी या संघाशी एकनिष्ठ राहिलो आहे. माझे क्षण वेगळे होते, पण मी त्यांच्यासोबत राहिलो आहे आणि ते माझ्यासोबत आहेत. माझे हृदय बंगळुरूसोबत आहे, माझा आत्मा बंगळुरूसोबत आहे. ही एक उच्च-तीव्रतेची स्पर्धा आहे, मला मोठ्या स्पर्धा आणि क्षण जिंकायचे आहेत. आज रात्री, मी बाळासारख झोपेन.